Wednesday 1 June 2016

खुदीराम बोस

भारतातील सर्वात तरुण क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधील मेदिनापुर जिल्ह्यातील बहुवनी या गावात ३ डिसेंबर १८८९ साली झाला. त्याच्या लहानपणीच आई आणि वडील यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरुपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्याचे पालनपोषण केले. बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटिश सरकारने १९०३ साली निश्चित केले. सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्कारला. सरकारच्या विरुध्द आंदोलने करणार्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणार्या न्यायाधीश किंग्ज फोर्डला मारुनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नवसंजीवनी पसरवली.
यातच खुदीरामने किंग्ज फोर्डला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. ३० एप्रिल १९०५ या दिवशी खुदिरामचा सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याने किंग्ज फोर्डच्या गाडीवर बॉम्ब फेकला, परंतु तो चुकून दुसर्याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या पण किंग्ज फोर्ड मात्र बचावला.
घटनेच्या दुसर्याच दिवशी खुदीराम पकडला गेला तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीरामवर खटला भरण्यात आला. त्याच्याविरुध्द हत्येचा गुन्हा सिध्द झाल्याने त्याला ११ ऑगस्ट १९०८ रोजी फाशी देण्यात आली. सशस्त्र क्रांतीत बॉम्बचा उपयोग करणारा खुदीराम हा पहिला क्रांतीकारक ठरला.

No comments:

Post a Comment