महाराष्ट्राचे राजकीय स्वरुप:
- १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी महाराष्ट्रात २६ जिल्हे, २३५ तालुके, २८९ शहरे व ३,५७७ खेडी होती. त्याचप्रमाणे मुंबई (कोकण), पुणे, औरंगाबाद, नागपुर हे चार प्रशासकीय विभाग होते
- सध्या महाराष्ट्राचे सहा प्रशासकीय विभाग आहेत. सुलभ प्रशासनासाठी नाशिक व अमरावती हे दोन नविन प्रशासकीय विभाग निर्माण केले आहेत. तर कालांतराने कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड करण्यात आले
- त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग, जालना, गडचिरोली, लातूर, मुंबई उपनगर असे पाच नवीन जिल्हे उदयास आले.
- सर्वप्रथम रत्नागिरी जिल्हा विभाजून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केली तर चंद्रपुर जिल्हा विभाजुन गडचिरोली जिल्हा निर्माण केला, त्यानंतर औरंगाबाद विभाजुन जालना तर उस्मानाबाद विभाजुन लातूर असे ३० जिल्हे निर्माण केले गेले
- मुंबई जिल्हा विभाजुन मुंबई उपनगर हा ३१ वा जिल्हा अस्तिवात आला
- १ जुलै १९९८ रोजी धूले जिल्ह्याचे विभाजन होउन नंदुरबार तर अकोला विभाजुन वाशिम असे महाराष्ट्रात ३३ जिल्हे झाले
- मे १९९९ मध्ये परभणी विभाजुन हिंगोली तर भंडारा विभाजुन गोंदिया हे जिल्हे निर्माण केले,
- सध्या महाराष्ट्रात ३५ जिल्हे आहेत, तर ३५८ तालुके आहेत
- २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ४३,६६४ खेडी तर ५३५ शहरे आहेत, २३ महानगरपालिका तर २२६ नगरपालिका आहेत. त्याचप्रमाणे ७ केन्टोमेंट बोर्ड्स आहेत