Wednesday 27 July 2016

डॉ. एपीजे अब्दुल कलाम

डॉ. एपीजे अब्दुल कलाम किंवा अबुल पाकीर जैनुलाबदीन अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. आपल्या आगळया कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय होते.

जन्म: १५ ओक्टोबर १९३१
मृत्यु: २७ जुलै २०१५ (वय ८३)
शिक्षण: त्यांचे वडील रामेश्वराला येणाऱ्या यात्रेकरुंना होडीतून धनुषकोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे क्षत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमावित व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना त्यांना गणिताची विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी. एससी झाल्यानंतर त्यांनी मद्रास इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते, बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून ऐरोडायनामिक्स डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महीने एरोस्पेसचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर डॉ. कलाम यांचा १९५८ ते १९६३ या दरम्यान संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी संबंध आला.
कार्य: १९६३ मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्थेत क्षेपणास्त्र विकासातील सैटेलाइट लॉन्चिंग वेहिकलच्या संशोधनात भाग घेतला. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र एकात्मिक विकासाचा कार्यक्रम हाती घेतला. यासाठी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओ मध्ये आले.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. इस्रोमध्ये असताना सैटलाइट लॉन्चिंग वेहिकल ३ या प्रकल्पाचे ते प्रमुख होते. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी असे व्यक्तव्य केले होते, पुढे ते विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे प्रमुख होते.
वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकाऱ्यांवरील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करुन घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यमधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओचे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम. बी. टी. रणगाडा व लाइट कॉम्बैट एयरक्राफ्ट यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पडली आहे.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदशील आणि साधे होते. भारत सरकारने १९८१मध्ये  'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' आणि १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला आहे. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपणी अथक परीश्रमात व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉ. कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे. 

No comments:

Post a Comment