Saturday 16 July 2016

चालू घडामोडी : महत्त्वाचे मुद्दे

१. राजेश कुमार चतुर्वेदी यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
२. जागतिक युवा कौशल्य दिन (यूथ स्किल डे) १५ जुलै रोजी साजरा करण्यात आला, विकास कौशल्याच्या मदतीने युवकांसाठीरोजगार निर्मिती करणे ही यंदाची थीम होती.
३. काळ्या पैश्याबाबत नेमण्यात आलेले (विशेष तपास पथक) निवृत्त न्यायमूर्ती एम बी शहा यांच्या समितीने काळ्या पैश्यावर रोख आणण्यासाठी एका दिवशी ३ लाख वरील रोख व्यवहारावर बंदी करण्याची शिफारस केली आहे.
४. याज मुक्त देश म्हणून भारत हा जगातील पहिला देश बनला आहे, याज हा उष्णकटिबंधीय देशांमध्ये आढळणारा संसर्गजन्य रोग असून हा त्रिपोनमा पाट्रेन्यू या जंतुमुळे होतो. हा रोग त्वचा, हाडे आणि सांधे यांवर प्रभाव करतो.
५. बिहारच्या नालंदा महाविहाराने यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये प्रवेश केला आहे. नालंदा महाविहाराची स्थापना गुप्त राजवंशाच्या राजा कुमारगुप्त पहिला ह्याने पाचव्या शतकात स्थापना केली आहे.
६. मध्य प्रदेश हे पहिले भारतीय संघराज्य आहे ज्याचे स्वतंत्र्य 'हैप्पीनेस डिपार्टमेंट' आहे, जे भूटानच्या हैप्पीनेस विषयावर (हैप्पीनेस विषयाचे स्त्रौत केंद्र) काम करेल.
७. महिला उद्योजकांसाठी देशातील पहिले औद्योगिक पार्क उत्तरखंड मधील फेडरेशन हाउस येथे सुरु करण्यात आले असून त्याचे अनावरण उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
८. जगातील पहिले ट्रेनवरील हॉस्पिटल अर्थातच भारताची लाइफलाइन एक्सप्रेसने ग्रामीण भारतातील गरीब आणि सरकारी योजना, मेडिकल सुविधांपासून वंचित असलेल्या जनतेला सुविधा देत आपल्या कार्याची २५ वर्षे पूर्ण केली आहेत.
९. फीफाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या फीफा रॅंकिंग मध्ये भारत १५२ व्या स्थानी आहे.
१०. भारताची ग्रँड मास्टर हरिका द्रोणवल्ली हिने चीनच्या छेदू येथे पार पडलेल्या फ़ीड विमेंस ग्रँड प्रिक्स ट्रॉफी जिंकली आहे.

No comments:

Post a Comment