Wednesday 27 July 2016

चालू घडामोडी : २३ जुलै

१. भारतातील पहिली सार्क पर्यटन बैठक महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये पार पडणार आहे?
उत्तर - औरंगाबाद, भारतातील पहिली सार्क पर्यटन बैठक महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये ऑक्टोबर २०१६ ला पार पडेल. २ दिवसीय परिषदेचा उद्देश्य म्हणजे मेक इन इंडिया, मेक इन महाराट्र अंतर्गत थेट परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हा असेल. परराष्ट्र मंत्रालयाने ह्या परिषदेसाठी औरंगाबाद निवडले आहे कारण २०१७ हे वर्ष 'विजिट महाराष्ट्र ईयर' म्हणून साजरे केले जाणार आहे तर २०१८ मध्ये अजंटा गुहांच्या उत्खननाला २०० वर्षे पूर्ण होणार आहेत.
२. इंडियन गोल्डन क्वाड्रीलेटरल (भारतीय सुवर्ण चतुष्कोण) पायी चालून पूर्ण करणारी मिशेल काकडे ही पहिली व्यक्ती आहे, ती कोणत्या शहराची रहिवाशी आहे?
उत्तर - पुणे, भारतीय सुवर्ण चतुष्कोण पायी सर करणारी मिशेल काकडे ही पुण्याची असून तिने १९३ दिवस १ तास आणि ९ मिनटांमध्ये ५९६८.४ किमीचा प्रवास करून चार भारतीय मेट्रो शहरांना जोडणारा भारतीय सुवर्ण चतुष्कोण प्रवास पूर्ण केला आहे. यासोबत तिच्या ह्या विक्रमाची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये 'भारतीय सुवर्ण चतुष्कोण पायी चालून सर्वात जलद पूर्ण करणारी महिला' अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
३. शाश्वत विकास ध्येय निर्देशांक (सस्टेनेबल डेवलपमेंट गोल इंडेक्स) मध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
उत्तर - ११० व्या, शाश्वत विकास ध्येय निर्देशांकच्या १४९ देशांच्या यादीमध्ये भारत ११० व्या स्थानी आहे. हा निर्देशांक सस्टेनेबल डेवलपमेंट सोलूशन्स नेटवर्क आणि दी बेरटलमैंन यांनी प्रकाशित केला असून हा निर्देशांक देशातील विकास आणि ध्येयधोरण ह्यांवर आधारित आहे. ह्या निर्देशांकामध्ये स्वीडन अव्वल स्थानी असून डेनमार्क, नॉर्वे त्याखालोखाल आहेत.
४. २०१६ च्या फार्च्यून ५०० जगातील मोठ्या कॉर्पोरेशन्स (महसूल दृष्ठिने) कंपनीच्या यादीमध्ये किती भारतीय कंपण्याचा समावेश आहे?
उत्तर - सात, २०१६ च्या फार्च्यून ५०० जगातील मोठ्या कॉर्पोरेशन कंपन्यांच्या यादीमध्ये ७ भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (१६१ वी), रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (२१५ वी), टाटा मोटर्स लिमिटेड (२२६ वी), स्टेट बँक ऑफ़ इंडिया (२३२ वी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (३५८ वी), हिन्दुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (३६७ वी) आणि राजेश एक्सपोर्ट्स (४२३ वी). ह्या यादीमध्ये सर्वप्रथम आहे वालमार्ट आणि त्याखालोखाल स्टेट ग्रिड, चाइना नॅशनल पेट्रॉलियम आहेत.
५. घाटमपुर औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे?
उत्तर - उत्तर प्रदेश, कोळश्यावर आधारित घाटमपुर औष्णिक वीज प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर जिल्ह्यातील घाटमपुर मध्ये सुरु होणार आहे. हा प्रकल्पामध्ये १९८० मेगावॉट बसविण्याची परवानगी केंद्राच्या आर्थिक विषयावरील कैबिनेट समितीने दिली आहे. ह्या प्रकल्पामध्ये नेयवेली उत्तर प्रदेश पॉवर लिमिटेड आणि उत्तर प्रदेश राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडची संयुक्य भागीदारी आहे.
६. भारतीय आधारच्या (यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - अजय भूषण पांडे, १९८४ बैचचे आईएएस ऑफिसर अजय भूषण पांडे यांची यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment