Sunday 24 July 2016

चालू घडामोडी : १८, १९ जुलै

१. 'दी ग्रेट इंडिया रन' भारतमधील पहिली मल्टी-सिटी मैराथॉन कोणत्या भारतीय शहरातून सुरु झाली?
उत्तर - नवी दिल्ली, भारतातली पहिली मल्टी-सिटी मैराथॉन 'दी ग्रेट इंडिया रन' नवी दिल्लीमधून १७ जुलै रोजी सुरु झाली. ही मैराथॉन भारतातील उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, दादरा आणि नगर हवेली राज्यांतून जाणार असून तिचा शेवट ६ ऑगस्टला मुंबई येथे होणार आहे.
२. खंगचेंदजोंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे?
उत्तर - सिक्कीम, खंगचेंदजोंगा राष्ट्रीय उद्यान सिक्किम राज्यामध्ये असून हरिण, बर्फीय चित्ता, हिमालयन तहर आढळून येतात. कॅपिटल कॉम्प्लेक्स ऑफ चंडीगढ़, खंगचेंदजोंगा राष्ट्रीय उद्यान, नालंदा महाविहारा यांना यूनेस्कोने तुर्कीच्या इस्तांबुलमध्ये झालेल्या ४० व्या वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीटिंगमध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला आहे. एक जागतिक वारसा ठिकाण म्हणजे इमारत, शहर, वाळवंट, जंगल, बेट, तलाव, पर्वत यांचा समावेश असतो आणि यांची निवड यूनेस्को केलेली असते.
३. २०१६ ची डब्लूबीओ एशिया पैसिफिक सुपर मिडिलवेट चषक कोणी जिंकले आहे?
उत्तर - विजेंदर सिंग, भारतीय मुष्टीयोद्धा विजेंदर सिंगने २०१६ ची डब्लूबीओ एशिया पैसिफिक सुपर मिडिलवेट चषक जिंकली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या अंतिम सामान्यामध्ये विजेंदर सिंगने डब्लूबीसी यूरोपियन चैंपियनशिप गतविजेत्या  केरी हॉपचा पराभव केला आहे.
४. कोणत्या भारतीय राज्यांमध्ये भारतातील पहिली एकात्मिक फौजदारी न्याय व्यवस्था (इंटीग्रेटेड क्रिमीनल जस्टिस सिस्टम) सुरु करण्यात आली आहे?
उत्तर - तेलंगाना आणि आंध्र प्रदेश, भारतातील पहिली एकात्मिक फौजदारी न्याय व्यवस्था तेलंगाना आणि आंध्र प्रदेश राज्यांमध्ये सुरु करण्यात आली आहे. ह्या व्यवस्थे अंतर्गत कोर्ट, पोलिस स्टेशन्स, फिर्यादी, प्रयोगशाळा, तुरुंग यांना एकत्रित आणेल.
५. ट्रेन अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणती सुरक्षा प्रणाली सुरु केली आहे?
उत्तर - त्रि-नेत्र, ट्रेन अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने त्रि-नेत्र ही सुरक्षा प्रणाली सुरु केली आहे. हे यंत्र इंफ्रारेड किरणे आणि रडार टेक्नोलॉजीचा वापर करून २-३ किमी अंतरापर्यंतची माहिती जमा करुन इंजिनमध्ये लावलेल्या डिस्प्ले स्क्रीनवर दाखवेल. ह्या प्रणालीमुळे मोटरमैनला ब्रेक लावण्यासाठी पुष्कळ वेळ मिळेल. त्याचप्रमाणे त्रि-नेत्र मोटरमैनला रेल्वे ट्रैकवर येणाऱ्या कोणत्याही भौतिक अडथळ्याबाबतही दक्ष करेल. ही सुरक्षा प्रणाली धुक्यामध्ये, मुसळधार पाऊस आणि रात्रीच्या मोटरमैनला सतत इंजिनच्या बाहेर बघून बाहेरील परिस्थितीचा आढावा घ्यावा लागतो अशावेळी उपयोगी येणार आहे.
६. 'टॉक टू ऐके' हा लाइव इंटरैक्टिव प्रोग्राम कोणत्या राज्य/केंद्र शासित प्रदेशाने सुरु केला आहे?
उत्तर - दिल्ली, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टॉक टू ऐके ह्या लाइव इंटरैक्टिव प्रोग्रामची सुरुवात केली आहे. ह्या योजनेअंतर्गत दिल्लीची सर्वसामान्य जनता थेट अरविंद केजरीवाल यांना सवाल-जवाब करेल. ह्या योजनेचा पहिला कार्यक्रम जवळपास तासभर चालला ह्यामध्ये दिल्लीच्या जनतेने शिक्षण, युवक अणि प्रशासन यांबाबत वेबसाइट आणि फ़ोनवरुन केजरीवाल यांना प्रश्न विचारले. 

No comments:

Post a Comment