Sunday 17 July 2016

चालू घडामोडी : १२ जुलै

१. कोणत्या राज्य सरकारने आपल्या आईपीएस अधिकार्यांच्या कामाचा मुल्यमापन अहवाल 'स्पैरो'मार्फ़त ऑनलाइन दाखल करणार आहे?
उत्तर - हरियाणा, हरियाणा सरकारने आपल्या आईपीएस अधिकार्यांच्या कामाचा मूल्यमापन अहवाल स्पैरो म्हणजेच स्मार्ट परफॉरमेंस अप्रैज़ल रिपोर्ट रिकॉर्डिंग ऑनलाइन विंडो मार्फत ऑनलाइन दाखल केला जाऊ शकतो. अधिकारी आपला अहवालअसेस्मेंट ईयर २०१५-१६ पासून दाखल करू शकतात.
२. भारतामध्ये दरवर्षी होणार्या डाळीची तूट अभ्यासण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना केली आहे?
उत्तर - अरविंद सुब्रमनियन समिती, केंद्र सरकारने भारतामध्ये दरवर्षी होणार्या डाळीच्या तूटीचा अभ्यास करण्यासाठी एक उच्च स्तरीय समितीची नेमणूक केली आहे. ही समिती आपला अहवाल २ आठवड्यामध्ये सादर करणार असून केंद्र सरकारने डाळीचा बफर स्टॉक ८ लाख हून २० लाख टन करण्याचा निर्णय घेतला आहे.
३. नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण झाल्या आहेत?
उत्तर - सुशीला कार्की, नेपाळच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून सुशीला कार्की यांनी नेपाळच्या राष्ट्रपती भवनामध्ये (शीतल निवास) राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांनी शपथ दिली. त्या ६ जून २०१७ पर्यंत न्यायपालिकेच्या प्रमुख असतील. सुशीला कार्कीसोबतच अयोधी प्रसाद यादव यांनी मुख्य निवडणूक आयुक्त पदाची शपथ घेतली.
४. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - डी राजकुमार, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटिड अर्थातच बीपिसीएलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी डी राजकुमार यांची नेमणूक करण्यात आली आहे. एस वी वरदराजन हे सध्याचे प्रमुख असून त्यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबरला संपणार असून १ ऑक्टोबर पासून राजकुमार आपला पदभार स्वीकरतील. राजकुमार यांच्यासोबत उत्पल बोरा यांची ऑइल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
५. २०१५ चा ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - रघुवीर चौधरी, ५१ वा २०१५ चा ज्ञानपीठ पुरस्कार डॉ. रघुवीर चौधरी यांना संसद संग्रहालय इमारत, नवी दिल्ली येथे बहाल करण्यात आला आहे. ११ लाख रोख आणि ब्रॉन्ज़ची सरस्वती देवीची मूर्ती असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
६. अमल दत्ता यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
उत्तर - फुटबॉल, माजी भारतीय फूटबॉलपटू आणि भारताचे पाहिले पूर्णवेळ प्रशिक्षक अमल दत्ता यांचे नुकतेच बागुईआटी कोलकाता येथे निधन झाले ते ८६ वर्षांचे होते. १९५४ मध्ये मनिला येथे झालेल्या एशियन खेळांमध्ये त्यांनी भारताकडून प्रतिनिधित्व केले होते त्यांनी डायमंड सिस्टम नावाची खेळ पद्धत निर्माण केली म्हणून त्यांना डायमंड कोच म्हणूनही ओळखले जाते. 

No comments:

Post a Comment