Monday, 15 August 2016

चालू घडामोडी : १०, ११ ऑगस्ट

१. वाघांवर आधारित भारतातील पहिली रिपोसिट्री (भांडार) कोणत्या शहरामध्ये उघडण्यात येणार आहे?
उत्तर - देहरादून, वाघांवर आधारित भारतातील पहिले भांडार वाइल्डलाइफ इंस्टिट्यूट ऑफ इंडिया आपल्या टाइगर सेल अंतर्गत देहरादूनमध्ये उभारणार आहे. ह्या भांडारामध्ये देशातील ५० हून अधिक व्याघ्र प्रकल्पातून माहिती, वाघांचे डीएनए, पट्ट्यांचे सैम्पल्स उपलब्ध असतील. वाघांचे सवंर्धन हे ह्या सेल मागचे मुख्य कारण आहे. त्याचप्रमाणे ही सेल संपूर्ण भारतातील वाघांची संख्या देखील तपासत राहणार आहे. ह्या टाइगर सेलला अर्थसहाय्य पर्यावरण मंत्रालया अंतर्गत असणारी नॅशनल टाइगर कंसर्वेशन अथॉरिटी करणार आहे.
२. सेन्ट्रल सिल्क बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - के एम हनुमंथरायप्पा, पुढील तीन वर्षांसाठी के एम हनुमंथरायप्पा यांची केंद्रीय रेशीम मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची नेमणूक एन एस बिसेगौड़ा यांच्या जागी करण्यात आली आहे. हनुमंथरायप्पा हे भाजपच्या डोबाबल्लापुरचे ज्येष्ठ नेते असून त्यांना कर्नाटकातील पारंपरिक रेशीम शेतीबद्दल माहिती आहे. रेशीम बोर्ड हे भारत सरकारच्या कापड मंत्रालयाअंतर्गत येणारी आणि देशातील रेशीम उद्योगांच्या विकासासाठी काम करणारी राष्ट्रीय संस्था आहे.
३. भारतामध्ये मेंटेनेंस फ्री हाईवे तयार करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय हाईवे प्राधिकरणाने कोणत्या आईआईटी सोबत करार केला आहे?
उत्तर - आईआईटी खरगपुर, नॅशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडियाने भारतामध्ये मैंटेनस फ्री हाईवे विकसित करण्यासाठी आईआईटी खरगपुरसोबत सामंजस्य करार केला आहे. आईआईटी खरगपुर करारा दरम्यान चांगल्या क्वालिटीचे सीमेंट कंक्रीट पवेमेन्ट्स तयार करणार आहे. ह्या कराराची मर्यादा ३ वर्ष असेल.
४. मुलगी दिनला लक्षात ठेवून कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सोशल मीडियावर मोहिम सुरु केली आहे?
उत्तर - महिला आणि बालविकास मंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी ११ ऑगस्ट डॉटर्स डेला लक्षात ठेवून सोशल मीडियावर मोहिम सुरु केली आहे. ११ ऑगस्ट पासून पूर्ण आठवडा सरकारच्या 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' अभियानाअंतर्गत डॉटर्स वीक म्हणून साजरा केला जाईल. त्याचप्रमाणे सरकारने जनतेला आव्हान केले आहे की त्यांनी त्यांच्या सुनेसोबत, नातीसोबत असलेले फोटो ट्वीटरवर शेयर करावेत.
५. भारतातील इ-कॉमर्स नियम अभ्यासण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या समितीची स्थापना केली आहे?
उत्तर - अमिताभ कांत समिती, केंद्र सरकारने भारतातील इ-कॉमर्स नियम अभ्यासण्यासाठी अमिताभ कांत समितीची स्थापना केली आहे. अमिताभ कांत हे नीती आयोगाचे मुख्यकार्यकारी अधिकारी आहेत. भारतामध्ये सध्या इ-कॉमर्स वाढत आहे त्यालाच संबंधित असलेले मुद्दे उदा. थेट विदेशी गुंतवणूक यावर ही समिती अभ्यास करेल. ही समिती इ-कॉमर्स सेक्टरची वाढ करण्यासाठी उपाय देखील सुचवेल.
६. 'गॉफिन-३' हा पृथ्वीवर लक्ष/निरिक्षण करण्यासाठी उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे?
उत्तर - चीन, चीनने लॉन्ग मार्च ४सी उपग्रहवाहू वाहनाच्या सहाय्याने अवकाशामध्ये गॉफिन-३ पृथ्वीचे निरिक्षण करण्यासाठीचा उपग्रह अवकाशामध्ये यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे. हा उपग्रह अवकाशामध्ये कमी उंचीवर परिभ्रमण करेल त्यामुळे हाई रेसोलुशनचे फोटो सहजरित्या घेऊ शकतो. याचा उपयोग आपत्ती चेतावनी, हवामान अंदाज आणि समुद्री सीमेवार संरक्षण यासाठी केला जाणार आहे. या उपग्रहाचे वयोमान ८ वर्षे असून सर्व प्रकारच्या हवामानामध्ये २४ तास निरिक्षण करू शकतो. 

No comments:

Post a Comment