Sunday, 8 December 2013

महाराष्ट्र : शेतीसंपत्ती भाग - १

भारत हा शेतिप्रधान देश असून देशामध्ये महाराष्ट्र शेती मध्ये अग्रेसर आहे. महाराष्ट्रमध्ये ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी, तांदूळ ही धान्यपीके तर उस, कापूस, भुईमुग ही नगदी तर मुग, मटकी, तूर व इतर डाळी कडधान्य पिकवली जातात. महाराष्ट्रातील शेतीसंपत्तीबद्दल थोडी अधिक माहिती:
  • पडवल हे उन्हाळी चार्याचे पीक महाराष्ट्रमध्ये घेतले जाते 
  • महाराष्ट्राच्या जास्त पर्जन्याच्या प्रदेशामध्ये भात हे पीक घेतले जाते 
  • पूर्व महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यात संत्र्याच्या बागाखलील क्षेत्र सर्वात जास्त आहे 
  • गहू हे ठंड हवामानातील पीक आहे 
  • काजूचे पीक हे जांभ्या मृदेत चांगले वाढते
  • कापसाची काळी मृदा रेगुर या नावाने ओळखली जाते 
  • ज्वारी पीकाखालील क्षेत्र व उत्पादन यामध्ये महारष्ट्र राज्य अग्रेसर आहे 
  • ज्वारीच्या पिकासाठी लागणारे हवामान म्हणजे उच्च तापमान व कमी पाऊस
  • रत्नागिरी जिल्हा हापुस या प्रकारच्या आंब्यांसाठी प्रसिद्द आहे 
  • मृदेतील घटकांचा आलटून पालटुन वापर होऊन मृदेची सुपीकता टिकून रहाते म्हणून शेतकरी पिकांची फेरपालट करतात
  • जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो 
  • कपसाचा दर्जा हा धाग्यांच्या लांबीवरुन ठरतो
  • महाराष्ट्रातील बाजरीच्या लागवडीखालील क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक येतो 
  • गांडूळामुळे जमिनीचे जैविक गुणधर्म सुधरतात म्हणून कृषीव्यवसायात गांडूळ शेती वरदान ठरली आहे
  • पीक संयोग म्हणजे, प्रमुख पीक व दुय्यम पीक यांच्यात क्षेत्रीय संबंध प्रस्थापित करणे होय 
  • पाला पाचोळा शेतात पसरून टाकणे म्हणजे खब भाजने होय
  • महाराष्ट्रातील खरीब हंगामात सर्वात अधिक क्षेत्र तृणधान्ये पिकाखाली असते 
  • महाराष्ट्राच्या एकूण जलसिंचन क्षेत्रपैकि सुमारे ५६% क्षेत्र विहिरीच्या पाण्याने भिजविले जाते 
  • नाइट्रोजनाचे व सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण महाराष्ट्राच्या मृदेत अल्प असल्यामुळे महाराष्ट्रात नाइट्रोजनयुक्त खतांना जास्त मागणी असते
  • महाराष्ट्रमध्ये पिकांना पुरेसा पाणीपुरवठा नसल्यामुळे येथे दर हेक्टरी उत्पादन कमी आहे
  • शेती व पशुपालन हे महत्त्वाचे मिश्र शेतीचे उदाहरण आहे 
  • बागायती शेती म्हणजे केवळ एकच प्रकारच्या पिकाचे उत्पादन
  • जगतिकीकरणामुळे कापसाच्या किंमती खाली आल्यामुळे विदर्भातील अनेक शेतकरी आत्महत्येच्या आहारी गेले 
  • अतिरिक्त जलसिंचनामुळे पानथळ प्रदेशाची निर्मिती होते 
  • महाराष्ट्रात ज्वारी पिकविणारा प्रदेश प्रामुख्याने गोदावरी-भीमा नदीच्या खोरे भागात आहे
  • पावसाळ्यात वाढणारी पीके म्हणजे खरीप पीके तर हिवाळ्यात वाढणारी पीके म्हणजे रब्बी पीके
  • पाणीपुरवठा करुण दिली जाणारी शेती म्हणजे बागायती शेती

No comments:

Post a Comment