महाराष्ट्र उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारच्या हवामान क्षेत्रामध्ये मोडतो, मार्चपासून कडक उन्हाळा तर जून महिन्यापासून मान्सुनी पावसाळा तर ऑक्टोबर महिन्यापासून हिवाळा असे तीन वेगळे ऋतु महाराष्ट्रातील जनतेला अनुभवास भेटतात. पश्चिमेकडून येणार्या काळसर ढगांपासून सह्याद्रीच्या काठावर ४०० सेमीहून अधिक पर्जन्य होते.
- सह्याद्री पर्वतच्या पश्चिम उतारावर पडणारा पाउस हा प्रतिरोध प्रकारचा असतो
- समुद्रावरुण येणारे वारे पश्चिम घाटामुळे कोकणात अडवले जातात यामुळे कोकणात प्रतिरोध पाउस पडतो
- महाराष्ट्राच्या वार्षिक पर्जन्याच्या वितरणाचे प्रतिनिधित्व कोल्हापूर जिल्हा करतो
- भारतात सर्वाधिक पर्जन्य मौसिनराम तर महाराष्ट्रात सर्वाधिक पर्जन्य आंबोली या ठिकाणी होते
- महाराष्ट्र पठारावर हवामान कोरडे तर कोकणचे हवामान हे सम आहे
- महाराष्ट्राच्या हवामानावर सह्याद्री पर्वतचा प्रामुख्याने प्रभाव पडतो
- उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा नागपूरला सर्वात जास्त तर अकोल्याला सर्वात कमी असते
- महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमान अकोला येथे आढळते
- दख्खनच्या पठारावर हवामान आद्र तर पठारी प्रदेशातील तापमान विषम प्रकारचे असते
- विजांच्या कडकडासह मुसळधार पाउस पडणे हे आवर्त पर्जन्याचे उदाहरण आहे
- दिवसा समुद्राकडून जमीनीकडे वाहणारे वारे म्हणजे खारे वारे तर रात्री जमीनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे म्हणजे मतलाई वारे
- जास्त उंचीवर हवेचा दाब कमी असतो कारण हवा विरळ असते
- हवा बाष्प सम्पृक्त होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हणतात
- नागपूरला उन्हाळ्यात आद्रता बरीच कमी असते
- समभार रेषा एकमेकींना जवळ असतात याचा अर्थ वायुभाराचे उतारमाण तीव्र आहे
- महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून वारा आगमन व निर्गमन यामध्ये अनिश्चितता असते तर ऑक्टोबर-नोवेम्बेर महिन्यादरम्यान मान्सून वारे माघारी फिरतात
- मान्सून या शब्दाचा अर्थ मौसमीपणा असा होतो
- मान्सून प्रदेशात नैऋत्य मैसमी वारे यामुळे पाउस पडतो तर पश्चिमघाटाच्या पूर्वेस पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात
- सूर्याची तिरपे किरणे पडतात त्यामुळे हिवाळ्यात महाराष्ट्रात काही वेळा तापमानात अचानक घट होते
- बाष्पीभवनामुळे वतवरणाच्या तापमानावर कोणताही बदल होत नाही
- एल नीनो म्हणजे दक्षिण प्रशांत महासागरातील उष्ण प्रवाह आहे
- खानदेश व विदर्भाचे हवामान हे विषम आहे
- मान्सून प्रदेशात हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे तीन ऋतु स्पष्टपणे अनुभवास येतात
- महाराष्ट्रात एकूण पर्जन्यपैकी १००% पर्जन्य नैऋत्य मैसमी वारे यामुळे होते
- महाराष्ट्रात उन्हाळ्यातसुद्धा माथेरान, महाबळेश्वर, तोरणमाळ या ठिकाणी हवा ठंड असते
No comments:
Post a Comment