Friday, 27 December 2013

समाजसुधारक

महात्मा जोतिराव फुले
जन्म - ११ एप्रिल १८२७ (कटगुण, सातारा)
मृत्यु - २८ नोव्हेंबर १८९० (पुणे)

जीवन कालखंडातील महत्त्वाच्या गोष्ठी:
  • १८४८ - पुण्यात मुलींची पहिली शाळा भिड़े वाडा, बुधवार पेठ 
  • १८५१ - बुधवार पेठेत दूसरी शाळा, चिपळूणकर वाडा (जुलै) तर रास्ता पेठेत मुलींसाठी तिसरी शाळा सुरु केली (सप्टेंबर)
  • १९६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, काशीबाई या विधवेच्या यशवंत नावाच्या मुलास स्वत: त्यांनी दत्तक घेतले 
  • १८६४ - पुण्यातील गोखले बागेमध्ये पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला 
  • १८५२ - अस्पृशांच्या मुलांसाठी वेताळ पेठेत शाला सुरु केली 
  • १८५३ - महर, मांग इ. लोकांस विद्या शिकविनारी मंडळी या नावाची संस्था पुण्यात स्थापन केली 
  • १८६८ - स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद अस्पृशासाठी खुला केला 
  • १८७३ - सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ही समाजसुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ 
  • सर्वसाक्षी जगतपति। त्याची नकोच मध्यस्थी।। हे सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य 
  • १८७७ - दुष्काळात धनकवडी येथे दुष्काळी पीडित विद्यार्थ्यांसाठी जोतिबांनी कैम्प उभारला होता 
  • १८८२ - हंटर कमीशनसमोर साक्ष देताना पुढील विचार मांडले, १० वर्षाखालिल मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे तसेच प्राथमिक शाळेतील शिक्षक शेतकरी वर्गातील व प्रशिक्षित असावेत
  • १८८८ - डयूक ऑफ़ केनेट भारताच्या भेटीवर आले असता त्यांनी पारंपरिक शेतकर्यांचा वेष धारण करुण त्यांची भेट घेतली आणि भारतीय शेतकर्यांचे दर्शन घडविले 
ग्रंथसंपदा:
  • गुलामगिरी - १८७३ 
  • शेतकर्यांचा आसूड - १८८३ 
  • इशारा - १८८५ 
  • सार्वजनिक सत्यधर्म - १८९१ 
  • तृतीय रत्न - १८५५ शिवजीराजांवर पोवाडे - १८६९ 
  • ब्राम्हणाचे कसब - १८६९ 
  • सत्सार - १८८५ 

No comments:

Post a Comment