कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते पीक प्रामुख्याने घेतले जाते किंवा कोणत्या पिकाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे,
- महाराष्ट्रात एकूण ज्वारीच्या क्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात आहे
- महाराष्ट्रात ज्वारीचे सर्वात कमी क्षेत्र भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात आहे
- महाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे क्षेत्र ६०% तर खरीप ज्वारीचे क्षेत्र ४०% आहे
- महाराष्ट्रात खरीप ज्वारीचे क्षेत्र नांदेड़ जिल्ह्यात तर रब्बी ज्वारीचे क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त आहे
- त्याचप्रमाणे ज्वारीच्या हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांक बुलढाणा जिल्ह्याचा तर हेक्टरी उत्पादनात सर्वात शेवटचा क्रमांक सोलापूर जिल्ह्याचा
- महाराष्ट्रमध्ये ज्वारीचे सर्वात कमी उत्पादन धुळे-नंदुरबार जिल्ह्यात होते
- भारतामध्ये महाराष्ट्राचा ज्वारीच्या क्षेत्र व उत्पादनमध्ये ४० ते ४५ टक्के वाटा आहे
- महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदळाचे क्षेत्र कोकणात ठाणे जिल्ह्यात तर सर्वात कमी क्षेत्र बुलढाणा जिल्ह्यात आहे
- तांदळाचे सर्वात जास्त उत्पादन ठाणे जिल्ह्यात तर सर्वात कमी उत्पादन अकोला व वाशीम जिल्ह्यात होते
- महाराष्ट्रात भाताचे सर्वात जास्त हेक्टरी उत्पादन कोल्हापूर होते
- भारतीय पातळीवर भाताच्या क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ३ टक्के आहे
- महाराष्ट्रात गव्हाचे सर्वात जास्त क्षेत्र व सर्वात जास्त उत्पादन अहमदनगर जिल्ह्यात होते
- महाराष्ट्रात बाजारीचे सर्वात जास्त हेक्टरी उत्पादन जालना जिल्ह्यात होते
- भारतीय बजारीच्या २३% उत्पादन महाराष्ट्रात होते
- महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊसाचे क्षेत्र व उत्पादन कोल्हापूर जिल्ह्यात आहे
- महाराष्ट्रात ऊसाचे सर्वात जास्त हेक्टरी उत्पादन सांगली जिल्ह्यात तर सर्वात कमी हेक्टरी उत्पादन बीड जिल्ह्यात आहे
- महाराष्ट्रात कापसाचे क्षेत्र सुमारे भारताच्या ३४% तर एकूण उत्पादनाच्या १५% आहे
- महाराष्ट्रात तेलबियांचे सर्वात जास्त क्षेत्र नागपूर जिल्ह्यात आहे
- महाराष्ट्रात नारळाचे सर्वात जास्त उत्पादन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे
- महाराष्ट्रात आंब्यांचे सर्वात जास्त उत्पादन रत्नागिरी जिल्ह्यात आहे
- महाराष्ट्रात केळीचे सर्वात जास्त उत्पादन जळगाव जिल्ह्यात आहे
- महाराष्ट्रात काजूचे सर्वात जास्त उत्पादन कोकण विभागात तर सिंधुदुर्ग जिल्हा कोकणात काजू उत्पादनात अग्रेसर आहे
- महाराष्ट्रात संत्र्याचे सर्वात जास्त क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे
- महाराष्ट्रात सर्वात जास्त द्रक्षांचे क्षेत्र नाशिक जिल्ह्यात तर आहे
- सज्यात सर्वात जास्त मोसंबीचे क्षेत्र जालना जिल्ह्यात आहे
- महाराष्ट्रात सोलापुर जिल्ह्यात डाळिंब उत्पादनात अग्रेसर आहे
- महाराष्ट्रात सर्वात जास्त फळ बागमध्ये क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे
- महाराष्ट्रात फळांचे सर्वात जास्त क्षेत्र रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे
No comments:
Post a Comment