महाराष्ट्र हे देशातील आकाराने तिसरे मोठे राज्य असून देशातील सर्वात औद्यीगिक व प्रगत राज्य आहे
राज्यातील काही प्रमुख शहरे पुढीलप्रमाणे :
१ - मुंबई:
राज्यातील काही प्रमुख शहरे पुढीलप्रमाणे :
१ - मुंबई:
- प्रमुख नदी - नाही
- मुंबई ही राज्यची राजधानी आहे तर देशाची आर्थिक राजधानी असून पश्चिम किअन्रवरिल महत्त्वाचे अंतरराष्ट्रीय बंदर आहे
- मुंबई हे कापड गिरण्याचे केंद्र आहे त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठ, मुंबई उच्च न्यायालय, तुर्भे तेल शुद्धीकरण केंद्र
- सात बेटांचे शहर म्हणून प्रसिद्ध, ऑगस्ट क्रांती मैदान, सनजत गांधी राष्ट्रीय उद्यान, हंगिग गार्डन, राणीचा बाग, तारापोरवाला मत्स्यालय इत्यादी प्रेक्षकीय ठिकाणे
- गेट वे ऑफ इंडिया भारताचे प्रवेशद्वार त्याचप्रमाणे देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर
२ - पुणे:
- प्रमुख नद्या - मुळा व मुठा
- विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक केंद्र, पेशव्यांची राजधानी
- बालभारती, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, वेधशाळा, भोसरी, आकुर्डी, खडकी, पिंपरी-चिंचवड येथे औद्योगिक वसाहती
- शनिवार वाडा, राजा केळकर संग्रहालय, सारसबाग, पर्वती, खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी
- फिल्म व टेलीविजन संस्था, कात्रज सर्पोद्यान, बालेवाडी क्रीडा संकुल,
- जवळच आळंदी येथे संत ड्यानेश्वर तर देहू येथे सनात तुकारामांची समाधी
३ - नागपूर
- प्रमुख नदी - नाग
- महाराष्ट्राची उप-राजधानी, राज्य विधीमंडळाची हिवाळी अधिवेशनाचे स्थळ, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ
- देशातील सर्वात मोठी संत्र्याची बाजारपेठ, सीताबर्डी किल्ला, कापड गिरण्या, हातमागाचे केंद्र, रामटेक येथे श्री रामांचे मंदिर
- देशाच्या मध्यस्थानी असल्यामुळे लोहमार्गाचे प्रमुख ठिकाण, रामटेक येथे कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ
- खापरखेडा व कोरडी औष्णिक वीज केंद्रे, आंबेडकर यांनी बौद्ध धर्म येथेच स्वीकारला
४ - वर्धा
- प्रमुख नदी - धाम
- सेवाग्राम येथे गांधीजींचा आश्रम तर पवनार येथे आचार्य विनोबा भावेंचा परमधाम आश्रम
- राष्ट्रभाषा प्रचार समितीचे केंद्र, हिंदी विश्वविद्यालय
५ - नाशिक
- प्रमुख नदी - गोदावरी
- सिंहस्थ कुंभमेळ्याचे ठिकाण, चाळणी नोटा व तिकिटे छापणारी सिक्युरिटी प्रेस
- ओझर येथे मिग विमानाचा कारखाना, गंगापूर येथे पहिले मातीचे धरण, द्राक्षे उत्पादन, एकलहरे येथे औष्णिक वीज केंद्र
६ - औरंगाबाद
- प्रमुख नदी - नाही
- ५२ दरवाजांचे शहर, बिबीका मकबरा, पाणचक्की हि प्रेक्षणीय स्थळे, अजिंठा-वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला हिमरू शालू त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ
- २०१० मध्ये नहार-ए-अंबरी या ऐतिहासिक पाणीयोजनेस राष्ट्रीय वारसा म्हणून मंजुरी
- महाराष्ट्राची पर्यटन राजधानी
७ - अमरावती
- प्रमुख नदी - नाही
- गाडगे बाबांची समाधी, प्रसिद्ध हनुमान आखाडा, कुष्ठ रोग्यांसाठी शिवाजीराव पटवर्धन यांचे तपोवन
- कापसाची मोठी बाजारपेठ, मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी
No comments:
Post a Comment