महाराष्ट्राला ७२० किमी चा सागरी किनारा लाभला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद हि ४ अंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत
महाराष्ट सागरी वाहतूक:
- राज्याला ७२० किमीचा लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे
- राज्याच्या सागरी किनारच्या उत्तरेला डहाणूपासून दक्षिणीकडे तेरेखोलच्या खाडीपर्यंत पाशीं किनार्यावर ४८ छोटी बंदरे आहेत
- मुंबई व न्हावाशेवा ही राज्यातील मोठी बंदरे आहेत
- मुंबई राज्यातील त्याचप्रमाणे देशातील प्रमुख अंतरराष्ट्रीय बंदर आहे
- मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी मुंबईपासून ५० किमी अंतरावर न्हावाशेवा येथे कृत्रिम बंदर तयार करण्यात आले आहे
- न्हावाशेवा तयार कण्यात आलेले बंदर म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे भारतातील सर्वात मोठे कंन्तेणार वाहतूक कारणाते बंदर आहे
- याखेरीज राज्यात डहाणू, धरमतर, रत्नागिरी, मालवण, सातपाटी, रेडी, देवगड, दाभोळ, जयगड, आचरे, अंजनवेल, आलेवाडी, वर्सोवा इत्यादी अन्य बंदरे आहेत
महाराष्ट्र विमान वाहतूक:
- राज्यातील प्रमुख अंतरराष्ट्रीय विमानतळ - छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार विमानतळ - मुंबई
- सांताक्रूझ हे देशांअंतर्गत वाहतुकीसाठी विमानतळ आहे
- याशिवाय लोहगाव पुणे, सोनगाव - नागपूर ही अंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत
- नोवेंबर २०१० मध्ये नवी मुंबईसाठी स्वतंत्र अंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा करण्यात आली असून २२ नोवेंबर २०१० रोजी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पास मंजुरी दिली आहे
No comments:
Post a Comment