Friday, 4 October 2013

महारष्ट्र सागरी व विमान वाहतूक

महाराष्ट्राला ७२० किमी चा सागरी किनारा लाभला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद हि ४ अंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत

महाराष्ट सागरी वाहतूक:
  • राज्याला ७२० किमीचा लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे
  • राज्याच्या सागरी किनारच्या उत्तरेला डहाणूपासून दक्षिणीकडे तेरेखोलच्या खाडीपर्यंत पाशीं किनार्यावर ४८ छोटी बंदरे आहेत
  • मुंबई व न्हावाशेवा ही राज्यातील मोठी बंदरे आहेत
  • मुंबई राज्यातील त्याचप्रमाणे देशातील प्रमुख अंतरराष्ट्रीय बंदर आहे
  • मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी मुंबईपासून ५० किमी अंतरावर न्हावाशेवा येथे कृत्रिम बंदर तयार करण्यात आले आहे
  • न्हावाशेवा तयार कण्यात आलेले बंदर म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे भारतातील सर्वात मोठे कंन्तेणार वाहतूक कारणाते बंदर आहे
  • याखेरीज राज्यात डहाणू, धरमतर, रत्नागिरी, मालवण, सातपाटी, रेडी, देवगड, दाभोळ, जयगड, आचरे, अंजनवेल, आलेवाडी, वर्सोवा इत्यादी अन्य बंदरे आहेत
महाराष्ट्र विमान वाहतूक:
  • राज्यातील प्रमुख अंतरराष्ट्रीय विमानतळ - छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार विमानतळ - मुंबई
  • सांताक्रूझ हे देशांअंतर्गत वाहतुकीसाठी विमानतळ आहे
  • याशिवाय लोहगाव पुणे, सोनगाव - नागपूर ही अंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत
  • नोवेंबर २०१० मध्ये नवी मुंबईसाठी स्वतंत्र अंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा करण्यात आली असून २२ नोवेंबर २०१० रोजी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पास मंजुरी दिली आहे

No comments:

Post a Comment