Friday 8 January 2016

श्रीनिवास रामानुजन

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ मध्ये इरोड (तंजावर), तामिळनाडू येथे एका ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला. ते एक महान भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदु गणिताचाच विचार करत असे, आणि म्हणूनच की काय अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.

संशोधन: वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. ते आपल्या शाळेतच नव्हे तर आपल्या जिल्ह्यात गणितामध्ये सतत अव्वल राहत होते. त्यांच्या असामान्य बिद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यावृत्तिही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.
१९०४ मध्ये त्यांचे मद्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यावेळी त्यांचे भविष्य खूपच उज्ज्वल होते त्यांना गणितामध्ये खूप बक्षिशे, शिष्यवृत्त्या ही मिळाल्या. ह्याच त्यांच्या गुणामुळे त्यांना कुंभकोणमच्या सरकारी कला कॉलेजमध्ये दाखला मिळाला.
रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापूण आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा गौरव झाला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रोफेसर हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरु केला. प्रोफेसर हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्यामुळे रामानुजन यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणितचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत,असे मत प्रोफेसर हार्डी यांनी व्यक्त केले. लवकरच रामानुजन यांना इंग्लडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षाच्या काळात रामानुजन यांनी बत्तीस संशोधनपर लेख लिहले. १९१८ साली रॉयल सोसयटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळविणारे ते पाहिले भारतीय होते.

मुर्त्यु: १९१९ साली रामानुजन इंग्लडमधून मयादेशी परत आले. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षी अंथुरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहतिसाव्या २७ एप्रिल १९२० रोजी महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणिती विश्वाचीच अपरिमित हानी झाली.

No comments:

Post a Comment