Friday, 7 March 2014

तीसरी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरीय बैठक नवी दिल्ली मध्ये संपन्न

कोणामध्ये - मालदीव, श्रीलंका आणि भारत 
कुठे - नवी दिल्ली, भारत 
कशाबद्दल - समुद्री सुरक्षा सहयोग याविषयावर तीसरी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरीय बैठक
केव्हा - ६ मार्च २०१४ 

मालदीव, श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये समुद्री सुरक्षा सहयोग विषयवार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरीय तीसरी बैठक नवी दिल्ली मध्ये ६ मार्च २०१४ रोजी आयोजित केली होती. या बैठकीचे अध्यक्ष भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन हे होते 
भारतीय शिष्ठमंडळाचे नेतृत्व शिवशंकर मेनन तर मालदीव शिष्ठमंडळाचे नेतृत्व मालदीवचे रक्षा त्याचप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री कर्नल मोहम्मद नजीम यांनी केले त्याचप्रमाणे श्रीलंकन शिष्ठमंडळाचे नेतृत्व श्रीलंकेचे रक्षा आणि शहरी विकास मंत्रालयाचे सचिव गोटाबाया राजपक्षा यांनी केले
समुद्री सुरक्षा सहयोग याविषयवरील ही तीसरी बैठक असून पहिली बैठक ऑक्टोंबर २०११ मध्ये मालदीव येथे पार पडली त्याचप्रमाणे दूसरी बैठक ही जुलै २०१३ मध्ये कोलंबो येथे पार पडली. पुढील वर्षी होणारी चौथी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरीय बैठक ही मालदीव मध्ये आयोजित केली जाणार आहे 

No comments:

Post a Comment