सरनाम्याचा अर्थ:
भारतीय सरनाम्यावरुण पुढील तीन गोष्टी स्पष्ट होतात,
१ - घटनेचे उगमस्थान
२ - राज्यव्यवस्थेचे स्वरुप
३ - राज्यव्यवस्थेचा उद्देश
१ - घटनेचे उगमस्थान हे भारतीय जनता आहे
- याचा अर्थ घटनाकारांनी बनविलेली घटना ही लोकांना मान्य असून भारतीय जनतेनेच ती स्वत:साठी बनवलेली आहे असा होतो
२ - राज्य व्यवस्थेचेस्वरुप
- सार्वभौम - १५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० या काळात स्वंतत्र भारताचे स्थान हे वसहातींचे स्वंतंत्र असे होते, कारण त्यावेळी घटना अमलात नव्हती. २६ जानेवारी १९५० रोजी घटनेच्या अम्बलबजानीमुळे भारत हे सार्वभौम राष्ट्र बनले, म्हणजेच अंतर्गत वा बहिगर्तरीत्या भारतावर आता कोणाचेही वर्चस्व राहिलेले नाही
- समाजवादी - भारताला साम्यवादी अथवा भांडवलशाही अर्थव्यवस्था मान्य नाही. भांडवलदारांपासून श्रमिकांचे शोषण थांबविण्यासाठी उत्पादनाची साधने व वितरणावर सामाजिक मालकी वा नियंत्रण ठेवणारी समाजवादी अर्थव्यवस्था भारतने स्वीकारली
- धर्मनिरपेक्ष - भारतात धर्म ही व्यक्तीची खाजगी वा ऐच्छिक बाब असून प्रत्येकाला कोणत्याही धर्माचा अवलंब करता येईल, मात्र सार्वजनिक बाबित धर्माची ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही
- प्रजासत्ताक - प्रजासत्ताक म्हणजे लोकानुवर्ती शासन, म्हणजेच सार्वभौम अशा भारतीय जनतेकडे देशाची अंतिम सत्ता
- गणराज्य - गणराज्य म्हणजे राजा नसलेले राज्य. गणराज्यात सर्वोच्च शासन प्रमुख हा लोकनियुक्त असतो. भारतीय गणराज्यात सर्वोच्च शासक हा राष्ट्रपती असतो. त्याची निवड जनतेद्वारे केलि जाते
३ - राज्यव्यवस्थेचा उद्देश
- भारताच्या सर्व नागरिकांना - सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म उपासना यांचे स्वतंत्र आहे. दर्जा आणि समान संधि आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मता व अखंडता मिळवून देणे हा भारतीय राज्यघटनेचा उद्देश आहे
- १९७६ च्या ४२ व्या घटना दुरुस्तीने घटनेच्या सरनाम्यात समाजवादी व धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्यात आला आहे
No comments:
Post a Comment