Wednesday, 13 November 2013

भारतीय राज्यघटना

  • घटना समितीची स्थापना - जुलै १९४६
  • त्रिमंत्री योजनेतील तरतुदीनुसार जुलै १९४६ मध्ये घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या, त्यानुसार २९९ सदस्यांनी घटना समिती अस्तित्वात आणली
  • घटना समितीचे प्रमुख सदस्य - डॉ. राजेन्द्रप्रसाद, जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभपंत, मौलाना आज़ाद, बाबासाहेब आंबेडकर, जयकर, कन्हैयालाल मुन्शी इत्यादी
  • प्रमुख स्त्री सदस्या - राजकुमारी अमृत कौर, हंसाबेन मेहता, सरोजिनी नायडू सह सात महिला घटना समितीच्या सदस्य होत्या
  • जिनांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम लीगच्या ७३ सदस्यांची घटना समितीच्या कामकाजात अजिबात भाग घेतला नाही
  •  डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे प्रथम अधिवेशन दिल्लीत पार पडले, डॉ सच्चिदानंद सिन्हा हे या काळात हंगामी अध्यक्ष होते
  • ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ राजेन्द्रप्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली
  • घटना समितीचे सल्लागार - बी. एन. राव 
  • घटना समितीच्या एकूण उपसमित्या - ११ 
  • २९ ऑगस्ट १९४७ घटनेच्या मसूदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब आंबेडकर यांची निवड केली
  • घटना समितीचे कामकाज एकूण १०८२ दिवस चालले 
  • घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज १६५ दिवस चालले 
  • मसूदा संयतीचे सदस्य - बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष), अलादी कृष्णस्वामी अय्यर, मुन्शी, गोपाल अय्यंगर, मोहम्मद सादुल्ला, खेतान
  • २२ जानेवारी १९४७ - जवाहरलाल नेहरुनी मांडलेल्या घटना समितीच्या उदिष्ट याबाबत ठराव मंजूर केला
  • २६ नोवेम्बर १९४९ - घटना समितीने भारताचे संविधान स्वीकृत केले, अध्यक्ष राजेन्द्रप्रसाद यांची स्वाक्षरी होती 
  • २४ जानेवारी १९५० - संविधान समितीची अखेरची बैठक 
  • २६ जानेवारी १९५० - पासून भारतीय राज्यघटना अंमलात आली
  • भारतीय राज्यघटना एकूण २४ भगत, १२ परिशिष्टात विभागली गेली आहे तिच्यामध्ये सुमारे ४४८ कलामे आहेत 
  • सुरुवातीला ८ परिशिष्टे व ३९५ कलामे होती
  • २००९ या वर्षी भारतीय राज्यघटनेच्या अम्बलबजावणीस ६० वर्षे पूर्ण झाली 
  • घटनेनुसार भारताने संसदीय पद्धतीची शासनव्यवस्था स्वीकारली असून राष्ट्रपती हा घटनात्मक प्रमुख आहे 
  • २२ जुलै १९४७ रोजी भारतीय राष्ट्रध्वजाची रचना घटना समितीने संमत केली 
  • भारतासाठी नवीन संविधान तयार करण्याचा आणि जुन्या संविधनात फेरबदल करण्याचा अधिकार फ़क्त घटना समीतीलाच आहे 
  • अलिकडेच घटनेच्या पुनरलोकनासाठी न्या वेंकटचलैय्या आयोग नेमन्यात आला होता

No comments:

Post a Comment