कोणी स्थापन केली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने
कशासाठी - वित्तीय सर्वसमावेशकता आणण्यासाठी
केव्हा - २३ सप्टेंबर २०१३
नचिकेत मोर - ICICI बँकेचे माजी कार्यकारी संचालक
शिफारसी -
कशासाठी - वित्तीय सर्वसमावेशकता आणण्यासाठी
केव्हा - २३ सप्टेंबर २०१३
नचिकेत मोर - ICICI बँकेचे माजी कार्यकारी संचालक
शिफारसी -
- 'क्लास बँकिंग'ला पर्याय देणारा 'मास बँकिंग'चा प्रयोग म्हणून अत्यल्प उत्पन्न असलेली कुटुंबे व लघुत्तम व्यावसायिकांसाठी विशेष बँकेच्या रचनेची शिफारस
- कमाल रु. ५०,०००/- रुपये खात्यात शिल्लक असेल अशा आर्थिक वर्गासाठी ठेव व कर्ज सोयी देणाऱ्या विशेष बँका असाव्यात
- 'होलसेल बँका' अशीही एक बँकांची वर्गवारी केली जावी, जेणेकरून निन्म आर्थिक स्तरासाठी वाहिलेल्या विशेष बँकासाठीचा निधीचा स्त्रोत खुला होईल
- लक्षणीय म्हणजे प्राधान्यक्रमाने कर्ज वितरण म्हणजे शेतकरी, लघुउद्योजक, निर्यातदार, ग्रामीण व वंचित घटकांना बँकांनी त्यांच्या एकूण वितरीत कर्जाच्या ५०% पूर्वीचे इतके कर्ज वितरीत केले जावे
- १ जानेवारी २०१६ पर्यंत १८ वर्षाच्या पुढे वय असलेल्या प्रत्येकाकडे स्वतंत्र, पूर्ण सेवा असलेले सुरक्षित इलेक्ट्रोनिक बँक खाते असले पाहिजे
- देशातील कोणत्याही भागात प्रत्येकाला १५ मिनिटे चालण्याचा अंतरावर पैसे काढण्याची, भरण्याची व बिले भरण्याची सोय असली पाहिजे
- अल्प उत्पन्न कुटुंबांसाठी 'पेमेंट बँक' हवी, अशी बँक सुरु करण्यासाठी किमान ५० कोटी भांडवल आवश्यक
- कृषी कर्जावरील व्याजमाफीची पद्धत बंद करून ते शेतकऱ्यांपर्यंत फायदे पोहचवले पाहिजेत
- आधारकार्ड असल्यावर बँकेत खाते लगेच उघडले गेले पाहिजे
- ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी अर्थमंत्रालयाच्या अखत्यारीत वित्तीय निवारण संस्था असावी
No comments:
Post a Comment