Wednesday 8 March 2017

चालू घडामोडी - २६, २७ फेब्रुवारी

१. अंतरराष्ट्रीय ऑलंपिक आयोगाच्या अथेलेट आयोगामध्ये बैडमिंटन वर्ल्ड फेडरेशनमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहे?
उत्तर - साइना नेहवाल, भारतीय बैडमिंटनपटु साइना नेहवाल आईओसीच्या अथेलेट आयोगाच्या बैडमिंटन वर्ल्ड फेडरेशनमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहे. ह्या प्रकारची संधी मिळणे हे भारतीय खेळाडूंसाठी दुर्मिळ आहे. ह्यआधी २०१६ मध्ये तिची आईओसीच्या अथेलेट आयोगामध्ये सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
२. कोणत्या राज्य सरकारने स्त्री-पुरुष समानतेवर देखरेख ठेवण्यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरु केला आहे?
उत्तर - हरियाणा, 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' योजने अंतर्गत हरियाणा सरकारने पानीपत जिल्ह्यामध्ये स्त्री-पुरुष समानतेवर लक्ष ठेवण्यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरु केला आहे. ह्या प्रकल्पांतर्गत मासिक तत्त्वावर प्रत्येक गावातून बाल गुणोत्तर जमा केले जाईल आणि ऑनलाइन साठविले जाईल.
३. ८९ व्या ऑस्कर पुरस्करांमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला?
उत्तर - मूनलाइट, बैरी जेनकिन्स यांनी दिग्दर्शित केलेल्या मूनलाइट ह्या अमेरिकन चित्रपटाला ८९ व्या ऑस्कर पुरस्करांमध्ये सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार मिळाला. हा कार्यक्रम लॉस एंजेल्समधील डॉल्बी थिएटर मध्ये पार पडला. त्याचप्रमाणे ह्याच चित्रपटाला सर्वोत्तम सह-कलाकार, सर्वोत्तम पथकथेचे रूपांतर पुरस्कार मिळाला.

४. भारतातील पहिला हिल स्टेशन सायकल रस्ता कोणत्या राज्यामध्ये सुरु करण्यात आला आहे?
उत्तर - पश्चिम बंगाल, भारतातील पहिला हिल स्टेशन सायकल रस्त्याचे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये उद्घाटन करण्यात आले. २० किमिचा रस्ता समुद्र सपाटीपासून २००० मीटर उंचीवर असून निळ्या आकाशाखाली पाइन झाडांच्या जंगलातून जातो. हा रस्ता भारतीय त्याचप्रमाणे परदेशी पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरु करण्यात आला आहे. हा रस्ता जोरबंगला सुरु होतो आणि इको-विलेज रिसोर्ट चटकपुर येथे संपतो.
५. कोणत्या संघाने ५ व्या कोल इंडिया हॉकी इंडिया लीगचे विजेतेपद जिंकले आहे?
उत्तर - कलिंगा लैंसर्स, चंडीगड़ मध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये कलिंगा लैंसर्सने दबंग मुंबईला ४-१ ने मात देऊन ५ व्या कोल इंडिया हॉकी इंडिया लीगचे जेतेपद जिंकले आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश विज़ार्ड्सने कांस्य पदक जिंकले. दबंग मुंबईचा फ्लोरियान फुच्स ह्या मालिकेचा मालिकावीर ठरला.
६. नव्या जागतिक संपत्ती अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत शहर कोणते आहे?
उत्तर - मुंबई, वर्ल्ड वेल्थ रिपोर्टनुसार ८०२ अब्ज संपत्ती असलेले मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत शहर असून जगामध्ये १४ क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे. मुंबई हे ४६००० कोट्याधीशांचे तर २८ अब्जाधीशांचे घर असून त्याखालोखाल दिल्ली, बंगलुरु, हैद्राबाद आणि पुणे आहेत.
७. कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सर्विस सेंटर सुरु केले आहे?
उत्तर - मध्यप्रदेश, मध्य प्रदेशातील विदिशा पोस्ट ऑफिस मध्ये मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी भारततील पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सर्विस सेंटरचे उद्घाटन केले. हे सेवाकेंद्र पासपोर्ट लघु सेवा केंद्र म्हणून काम करेल. त्याचप्रमाणे पासपोर्ट अर्जाची छाननी करुण अर्जदाराला ३ दिवसांमध्ये पासपोर्ट देईल.

No comments:

Post a Comment