Thursday, 14 January 2016

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रातील  खनिजसंपत्तीची प्रमुख क्षेत्रे:
१. पूर्व विदर्भ:  चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, नागपुर व यवतमाळ जिल्हे.
२. कोकण व दक्षिण महाराष्ट्र: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि कोल्हापुर जिल्हे.
महाराष्ट्रात प्रमुख खनिजांचे २८५ पट्टे व गौण खनिजांचे २०३ पट्टे आहेत.
* मैंगनीज: भारताचा ४०% साठा  एकट्या महाराष्ट्रात असून, प्रमुख साठे भंडारा, नागपूर या खालोखाल सिंधुदुर्ग जिल्हा येतो.
  • भंडारा-गोंदिया - डोंगरी बुद्रुक, चिखला व इतर १३ ठिकाणे. 
  • पूर्व विदर्भ - गुमगाव, रामडोंगरी, कोदेगाव, मनसर कंट्री, जुनेवाणी, माटक, बैलडोंगरी, पारसीवणी. 
  • सिंधुदुर्ग - सावंतवाडी आणि वेंगुर्ला परिसर.
* लोहखनिज: भारताचा २०% लोहखनिज साठा महाराष्ट्रात आहे. प्रमुख साठे - चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्हे.
  • चंद्रपूर व गडचिरोली: लोहरा, असोला, देवळगाव, बिआसी, पिंपळगाव, फुसेर, रतनपुर, सुरजागड, वाढवी, दामकोट, मेटा, विभागात २७५ दशलक्ष टन लोहखनिज साठा आहे.
  • भंडारा-गोंदिया: खुर्सीपुर
  • सिंधुदुर्ग: वेंगुर्ला, सावंतवाडी, रेडी
* बॉक्साइट: महाराष्ट्रामध्ये जवळपास ६२ दशलक्ष टन साठे असून ते कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सांगली, आणि सातारा
  • कोल्हापुर: राधानगरी, गारगोटी, वाकी, उदगिरी, कसरवाडा, नागरतावाडी
  • रायगड: मुरुड, रोहा, श्रीवर्धन
  • ठाणे: सालसेट बेट, टुंगर टेकड्या
  • सिंधुदुर्ग व रत्नागिरी: अंबोली घाट, दापोली व मंडणगड
* क्रोमाइट: महाराष्ट्रात १०% साठा  असून सिंधुदुर्ग, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये प्रमुख साठे आहेत.
  • सिंधुदुर्ग: कणकवली, जानोली व बागदा
  • भंडारा: मौनी
  • नागपूर: टाका
* चूनखड़ी: यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात प्रमुख साठे आहेत.
  • चंद्रपूर: वरोडा (पुरकेपार, कोंडरा, परथा), राजुरा तालुका (संगोडा, चांदुर, गंगापूर)
  • अहमदनगर: कायूर, कंडुर

Monday, 11 January 2016

महाराष्ट्र: कोकण विभाग

कोकण विभाग हा महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई त्याच प्रमाणे मुंबई उपनगर हे देखील कोकण विभागमध्येच येतात.

इतिहास: ब्रिटिश काळात कोकण विभाग हा मुंबई इलाख्यातील उत्तर किंवा गुजरात विभागात मोडत होता. ब्रिटिश काळात कोकण विभागात ठाणे, कुलाबा, रत्नागिरी हे तीनच जिल्हे होते.  १९६१ मध्ये कोकण विभाग हा नव्याने स्थापित झालेल्या महाराष्ट्राचा भाग बनला. १९८१ साली सत्नगिरी जिल्यापासून सिंधुदुर्ग जिल्याची निर्मिति झाली. कुलाबा जिल्याचे रायगड असे नामांतर करण्यात आले. २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्यावरील प्रशासकीय कारभार कमी करण्यासाठी  ठाणे जिल्ह्यापासून पालघर जिल्याची निर्मिति करण्यात आली.

चतुःसीमा: कोकण विभागाच्या पश्चिमेस अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे तर पूर्वेस पुणे विभाग आहे ज्याला पश्चिम महाराष्ट्र असेही संबोधले जाते. उत्तरेस गुजरात राज्य तर दक्षिणेस गोवा राज्य आहे.

थोडक्यात माहिती:
  • क्षेत्रफल: ३०,७४६ किमी वर्ग
  • लोकसंख्या: २,४८,०७,३५७ (२००१ ची जनगणना)
  • जिल्हे: मुंबई, मुंबई उपनगर, रायगढ़, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  • साक्षरता: ८१.३६%
  • कोकण विभागातील मुंबई हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा तर सिंधुदुर्ग हा सर्वत कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.

Saturday, 9 January 2016

जागतिक संघटना व त्यांचे मुख्यालय

जग भरातील मुख्य जागतिक संघटनाचा आढावा आपण घेणार आहोत, ह्या संघटना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अनेक वेळा विचारल्या गेल्या आहेत. येथे जागतिक संघटनांची पूर्ण लिस्ट आहे ज्यामध्ये त्यांचे नाव, मुख्यालय, स्थापना वर्ष लिहिले आहे.
 जागतिक संघटनचे नाव
मुख्यालय
स्थापना वर्ष
संयुक्त राष्ट्रे
न्यु यॉर्क
१९४६
खाद्य आणि कृषी संस्था
रोम, ईटाली
१९४५
अंतरराष्ट्रिय अणुऊर्जा संस्था
विएना
१९५७
अंतरराष्ट्रिय नागरी उड्डाण संस्था
मोंटेराल
१९४४
अंतरराष्ट्रिय कामगार संस्था
जिनीवा
१९४५
अंतरराष्ट्रिय सागरी संस्था
लंडन
१९६०
अंतरराष्ट्रिय समुद्री संस्था
किंग्स्टन
१९९४
अंतरराष्ट्रिय दूरसंचार यूनियन
जिनीवा
१९४९
अंतरराष्ट्रिय समुद्री कायदे लवादा
हैम्बर्ग
१९६९
संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था
पॅरिस
१९६४
यूनिवर्सल पोस्टल यूनियन
बार्न
१८७४
जागतिक आरोग्य संघटना
जिनीवा
१९४८
जागतिक बैद्धिक संपदा संघटना
जिनीवा
१९८६
जागतिक हवामान संघटना
जिनीवा
१९५०
जागतिक व्यापर संघटना
जिनीवा
१९६८

चालू घडामोडी

१. कसोटी, एक-दिवसीय त्याचप्रमाणे टी-२० सामने एकत्रित केल्यानंतर कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने अंतरराष्ट्रिय क्रिकेट विश्वामध्ये १००० शतके झळकाविण्याचा मान पटकाविला आहे?
उत्तर - ऑस्ट्रेलिया
२. बीसीसीआयचा यंदाचा सी. के. नायडू पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
उत्तर - सैय्यद किरमाणी
३. पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच कोणत्या देशाच्या संसदेच्या इमरतीचे उद्धघाटन केले?
उत्त्तर - अफगानिस्तान 

४. केंद्र सरकारने कोणास योग रिसॉर्ट तयार करण्यासाठी बेट देऊ केले आहे?
उत्तर - बाबा रामदेव
५. कोणत्या भारतीय उद्योगसमुहाने ३७० कोटी रुपयांना पिनिन फॉरिना (इटालियन कार डिजाइन कंपनी) ताब्यात घेतली आहे?
उत्त्तर - महिंद्रा ग्रुप
६. मार्च २०१६ पर्यंत कोणते राज्य वगळता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी अन्नसुरक्षा कायदा लागु करण्याची तयारी दर्शविली आहे?
उत्त्तर - तामिळनाडू

७. कोणाची विप्रोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन नेमणूक केली आहे?
उत्त्तर - आबीद अली निमुचवाला
८. २०१५ चे कोस्टा नावेल पारितोषिक कोणी जिंकले आहे?
उत्तर - केट एटकिंसन
९. कोणत्या तारखेला अंतरराष्ट्रिय ब्रेल दिन पळाला जातो?
उत्तर - ४ जानेवारी
१०. कोणत्या भारतीय संघराज्याने उज्वल डिस्कॉम असुरांस योजनेसाठी लागणाऱ्या सामंजस्य करारावरती सर्वप्रथम स्वाक्षरी केली आहे?
उत्तर - झारखंड

Friday, 8 January 2016

श्रीनिवास रामानुजन

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ मध्ये इरोड (तंजावर), तामिळनाडू येथे एका ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला. ते एक महान भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदु गणिताचाच विचार करत असे, आणि म्हणूनच की काय अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.

संशोधन: वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. ते आपल्या शाळेतच नव्हे तर आपल्या जिल्ह्यात गणितामध्ये सतत अव्वल राहत होते. त्यांच्या असामान्य बिद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यावृत्तिही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.
१९०४ मध्ये त्यांचे मद्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यावेळी त्यांचे भविष्य खूपच उज्ज्वल होते त्यांना गणितामध्ये खूप बक्षिशे, शिष्यवृत्त्या ही मिळाल्या. ह्याच त्यांच्या गुणामुळे त्यांना कुंभकोणमच्या सरकारी कला कॉलेजमध्ये दाखला मिळाला.
रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापूण आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा गौरव झाला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रोफेसर हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरु केला. प्रोफेसर हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्यामुळे रामानुजन यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणितचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत,असे मत प्रोफेसर हार्डी यांनी व्यक्त केले. लवकरच रामानुजन यांना इंग्लडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षाच्या काळात रामानुजन यांनी बत्तीस संशोधनपर लेख लिहले. १९१८ साली रॉयल सोसयटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळविणारे ते पाहिले भारतीय होते.

मुर्त्यु: १९१९ साली रामानुजन इंग्लडमधून मयादेशी परत आले. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षी अंथुरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहतिसाव्या २७ एप्रिल १९२० रोजी महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणिती विश्वाचीच अपरिमित हानी झाली.

Monday, 4 January 2016

चालू घडामोडी - २ - ३ जानेवारी २०१६

१. कोणत्या राज्य सरकारने 'जन्मा भूमी - माँ वुरु' नविन योजना सुरु केला आहे?
उत्तर - आंध्र प्रदेश, २ जानेवारी २०१६ रोजी आंध्र प्रदेश सरकारने 'जन्मा भूमी - माँ वुरु' (माझे जन्मस्थान - माझे गाव) हो योजना सुरु केली आहे. ही योजना 'स्मार्ट गाव, स्मार्ट वार्ड, स्मार्ट आंध्र प्रदेश'ला उद्देशून केला आहे.

२. कोणते शहर १०३ व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे आयोजन करणार आहे?
उत्तर - मैसुर, १०३ व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे उद्धघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ जानेवारी २०१६ रोजी मैसूर येथे केले. यावेळी त्यांनी ५ ई  चा नविन मंत्र दिला - इकोनॉमी, एन्वारोमेंट, इनर्जी, इम्पथी आणि इक्विटी.

३. कोणत्या देशाने सैफ सुजुकी कप २०१५ वर आपले नाव कोरले आहे?
उत्तर - भारत, भारताने सैफच्या अंतिम लढतीमध्ये गतविजेत्या अफ़ग़निस्तानचा २-१ असा धुव्वा उडविला. भरतने आजवर ७ वेळा सैफ चषक जिंकला आहे. सहभागी संघ - बांग्लादेश, भूटान, भारत, मालदीव, नेपाल, पाकिस्तान, श्री लंका, अफगानिस्तान.

४. अरुणिमा सिन्हा ही भारतीय महिला कशाशी निगडित आहे?
उत्तर - गिर्यारोहक, नुकतेच अरुणिमा सिन्हाने माउंट अकोनकागुआ, अर्जेंटीना, दक्षिण अमेरिका हा पर्वत सर केला. यासोबतच ती जगातील पहिली अपंग महिला गिर्यारोहक जिने ५ पर्वत सर केले आहेत. तिने आज पर्यंत माउंट एवेरेस्ट (आशिया), माउंट किलिमंजारो (अफ्रीका), माउंट एल्ब्रुस (यूरोप), माउंट कॉसिज़्को (ऑस्ट्रेलिया), माउंट अकोनकागुआ (दक्षिण अमेरिका)

५. कोणते भारतीय संघराज्यात राजा-राणी संगीत उस्तव साजरा केला जातो?
उत्तर - ओडिशा, राजा-राणी महोस्तव हा ओडिशामधील महत्त्वाचा उस्तव आहे. हा उस्तव राजरानी मंदिर ट्रस्टतर्फे १८ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान साजरा केला जातो. राजरानी मंदिर हे ११ व्या शतकामध्ये बांधले असून ते भुवनेश्वर मध्ये स्थित आहे.

६. नुकतीच कोणाची भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
उत्तर - अतुल सोबती, अतुल सोबती यांची पुढील पांच वर्षांसाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या अधयक्ष व व्यवस्थाथपकीय संचालक म्हणून नेमणूक झाली आहे.